Skip to main content

World War III & Ramrajya 2025

रामराज्य 2025 - डॉ अनिरुद्ध जोशी (बापु ) :

 हरी ॐ,
२००६ ला डॉ अनिरुद्ध जोशी(बापू)नी  तिसरे महायुद्ध पुस्तक लिहिले व त्यावर अनेक वेळा प्रवचनातुन देखील सांगितले आहे, तेव्हापासून बापू वारंवार सांगतो आहे जागतिक राजकारणात अराजकता माजत चालली आहे. अराजकता म्हणजे नेमके काय? तर मानव हा  सात्विकतेपासून दूर लोट्ला जातोय व त्यातून वैयक्तिक व सामूहिकरित्या अशा दोन्ही प्रकारे होणारे पाप. 
                                                         अनिरुद्ध बापू बद्दल बोलावे तेवढे कमीच. तो म्हणतो मला एकाच भूमिकेत जगायचे आहे, 'मी तुमचा मित्र आहे कधीही दगा न देणारा मित्र, मला तुमच्याकून कसलीच अपेक्षा नाही' असा हा अनिरुद्ध. त्याची अपार तळमळ आहे ह्या पृथ्वीला व आपल्याला येणाऱ्या संकटपासून सावध करुण सुखरूप जीवन जगता यावे. पण आपण मानव त्याला व त्याच्या कार्याला नाही समजू शकत.




अतिशय अपुऱ्या शब्दात मी त्याचे प्रेम आपल्यापर्यन्त पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मी व सोबत असलेल्या भक्तानी अकारण कारुण्य अनुभवले आहे. तो निःस्वार्थ प्रेम करतो प्रत्येक मानवा वर कुठल्या ही अपेक्षेशिवाय.


रामराज्य २०२५ ही बापूंची संकल्पना व निर्धार आहे. तो म्हणतो 'मला जे करायचे ते मी करणारच, पूर्ण पृथ्वी जरी माझ्या विरोधात गेली तरीही मी माझ्या मूल्याना चिकटूनच पुढे  सरकणार'. अखंड मानव जातीला ह्या येणाऱ्या महासंकटातून वाचविण्यासाठी तो पुन्हा एकदा पृथ्वीवर जन्म घेऊन आला आहे. नेहमी तो येतोच तसा आता  ही आला. फ़क्त गरज आहे त्याला ओळखून साद घालण्याची.

हां कोण आहे? कसा प्रगटला? हे जानूण  घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

मित्रांनो बापू खरोखरच अतिशय प्रेमळ आहे. तो सामान्य मानवाच्या खुप पुढे आहे वेगळा आहे. खुप वाइट वाटत जेव्हा अनेक जणांना तो कळतो तरी वळत नाही. मी म्हणतो म्हणून मुळीच विश्वास ठेउ नका. स्वतः अनुभवा त्याला आपले काहीच नको आहे. तो फ़क्त द्यायला बसलेला आहे भक्त म्हणून त्याला लूटा. जसा काळ येतो तसा देव देखिल अवतार घेतो ह्याची प्रचिती आली. कधी कधी विचार करुण थक्क होतो की हा भगवंत भक्ता साठी कहिहि करु शकतो. कुठल्याही रुपात तो येतोच. 

त्याचे दैवी सामर्थ्य त्यागुन मानवी जीवनाचा  सर्व बाजूनि विकास कसा करायचा ह्याचे प्रत्यक्षिक देऊन निर्भयपणे जीवन जगायला शिकवणारा सद्गुरु म्हणजे अनिरुद्ध बापु. ह्या युद्धात स्वतः सुरक्षित राहून एक सामान्य भक्त आपल्या कुटुंबाचे व इतर लोकांचे संरक्षण कसे करेल ह्याचे ट्रेनिंग बापु देतो. त्याच बरोबर युद्धानंतर सर्व जगाला तारणारा भारतच असेल हे सांगणारा बापु २०२५ मध्ये रामराज्याची स्थापना करणार.

रामराज्याची सुरुवात ग्रामराज्याच्या स्टेशन पासून होते असे सांगणारया बापुनि AIGV(अनिरुद्धा'ज  इंस्टिट्यूट ऑफ़ ग्रामविकास)  ची स्थापना केली व त्यातून शेन्द्रिय शेती व शेतीला पूरक असणारे व्यवसाय ह्यांचे प्रशिक्षण मोफत सुरु केले. युद्धकाळात किंवा युद्धा नंतर पाण्याचा निश्चित दुष्काल पडणार म्हणून कमी पाण्यात कशी उत्तम शेती व व्यवसाय करता येईल हे देखील ट्रेनिंग देण्यात येत .



रामराज्यात सुखरूप पोचण्यासाठी दिलेला बेस्टेस्ट मार्ग म्हणजे चण्डिकाकुलाची उपासना, रामनाम वही, अनिरुद्धा'ज  इंस्टिट्यूट ऑफ़ डिजास्टर मैनेजमेंट असे सहज शक्य असणारे सोपे मार्ग आहेत .
बापु डॉक्टर असल्यामुळे आपल्या आरोग्याची खुप काळजी घेतो त्यात सकाळी उठल्यावर सर्व प्रथम

१) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
२) १ लीटर पाणी पिने
३) कढीपत्त्याचची कमित कमी ५ पाने रोज जेवणात खाने .
४) दररोज १ तास चालने
५) सकाळी १० च्या आधीचे कोवळे उन अंगावर घेणे.
६) शताक्षी  प्रसादम  (शताक्षी गोळी विषयी माहितीसाठी खालील इमेज बघा).



अतिशय सुन्दर असा मार्ग बापुनि दिला आहे. फ़क्त आपले जीवन सुन्दर बनवण्यासाठी तो प्रयास करत राहतो.
आजच्या भयानक कलियुगात कलीच्या दुष्ट प्रभावापासून वाचायचे असेल तर ह्याहुन अधिक सुंदर सोपा मार्ग असणे शक्यच नाही.
वरील दिलेल्या गोष्टी का करायच्या? तर युद्धा नंतर उद्भावनारया आजारांशी लढण्यासाठी श्रद्धावानांच्या शरीरात आवश्यक ती शक्ति निर्माण करण्याची क्षमता ह्या शताक्षी मध्ये आहे.
युद्ध काळात होणारा वातावरणातील बदल व त्याचा मानवी शरीरावर होणारा विघातक परिणाम पाहता बपुनि आपल्याला चण्डिकेचि पवित्र उपासना व उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी दिलेला राजमार्ग तसेच अनिरुद्धा'ज  इंस्टिट्यूट ऑफ़ रामनाम सारखे शस्त्र  आपल्या हाती दिल आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जीवनात स्वीकार करने म्हणजेच रामराज्य जीवनात उतरवणे होय.

आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा !!
 अम्बद्न्य || नाथसंविध || श्रीराम 








Comments

  1. एकदम कडक एकच नंबर भाई नाद खुळा
    दुष्मन कितीही जळूद्या शेवटी बाप बापच आहे

    ReplyDelete

Post a Comment